वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- गजानन पोटदुखे
दिनांक :- 14 मार्च 2024
वर्धा जिल्ह्या लोकसभा निवडणुकीकरिता भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा रामदास तडस यांना तिकीट निश्चित केलेली आहे . सतत दहा वर्ष सत्तेत असताना खूप मोठे विकास कामे वर्धा जिल्ह्यासाठी काम केलेले आहे. सामान्य नागरिकांना मध्ये लोक नेते त्याची ओळख आहे.नगर परिषद देवळी येथून त्याची राजकीय कारकीर्द सुरुवात करण्यात आली.सामान्य कुटुंबात त्याचा जन्म 1 एप्रिल 1953 झाला आहे. सामान्य नागरिकांशी त्याची नाळ सतत जोडलेली असते. सतत तिसऱ्यांदा लोकसभेसाठी त्यांना निवडणूक लढविण्याकरिता निवड होणे हे वर्धा वासीयांसाठी फार अभिमानाची बाब आहे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये फार उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे.