धानोली-बाम्हणी रस्त्यासाठी जनप्रतिनिधीनी केले हात वर ; गावात राहणार चुल्हा बंद…..

0
448

अनिश्चितकालीन आमरण उपोषणनाचा आज पाचवा दिवस

उपोषणाला गावकऱ्यांचा उत्फुर्त पाठिंबा, गावात राहणार चुल्हा बंद

सालेकसा/ बाजीराव तरोने

क्षेत्रातील धानोली-बाम्हणी हा जोड रस्ता या क्षेत्रातील लोकांकरिता अत्याधिक महत्त्वपूर्ण झालेला आहे सदर रस्ता नसल्याने ग्रामपंचायत धानोली, बाम्हणी, दरबडा, बोदलबोडी, नानव्हा, गिरोला, घोन्सी, पीपरटोला, भजेपार येथील नागरीकांना आरोग्य सेवा, शिक्षण, कृषि-माल विक्री, बाजारपेठ, सरकारी कामे इत्यादी करिता आमगाव-गोंदिया येणे-जाने करावे लागते. त्याकरिता येथे धानोली ते बाम्हणी ०४ किमी चा रस्ता असून सदर रस्ता आतापर्यंत बनलेला नाही. त्यामुळे या क्षेत्रातील लोकांना व शाळेकरी विद्यार्थ्यांना २५ किमीच्या फेरा करून वेळ आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. पुष्कळ वर्षापासून शासनाला व लोकप्रतिनिधींना वारंवार निवेदन देऊन सुद्धा रस्ता तयार करण्यात दुर्लक्ष होत आहे. नाईलाजाने परिसरातील लोकांनी एकत्र येऊन दि १०/०८/२०२४ ला धानोली गावात भव्य सभा घेण्यात आली व सभेत सर्वानुमते आंदोलनाचे मार्ग स्वीकार करण्याचे ठरविले. त्यानुसार वरील मार्ग प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत तयार करण्याकरिता आवश्यक ते कार्यवाही शासनाने २८/०८/२०२४ पर्यंत पूर्ण करून आम्हाला लेखी कळवावे अन्यथा या परिसरातील नागरिकांना उपोषण शिवाय पर्याय नाही याची सर्व जबाबदारी शासनावर राहील असे हि निवेदन प्रशासनाला नागरिकांनी दिले होते. शेवटी आमरण उपोषणाचा मार्ग 05 सप्टेंबर पासुन नागरिकांच्या सहकार्याने सूरू झाला.त्यात विशेषतः शामू मेश्राम, राहुल बघेले, अक्षय डोंगरे, होमेंद्र कटरे, जितेंद्र टेंभरे व उपस्थित आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख्यानी घेतली रस्त्याची जबाबदारी

धानोली-बाम्हणी रस्त्यासाठी उपोषणनाच्या चौथ्या दिवसी (काल 08 सप्टे.) उपोषण स्थळाला शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेन्द्र नायडू यांनी भेट दिली असुन वर्षानुवर्षे रडखडलेल्या कामाची जबाबदारी स्वतः त्यांनी घेतली. उपोषण कर्त्याना काही दिवसाचा वेळ त्यांनी मागितला असुन याची जवाबदारी मी घेतो असे त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुनसिंग बैस, जिल्हा समन्वयक डॉ. हिरालाल साठवणे, सालेकसा तालुका अध्यक्ष विजय नागपुरे, युवासेना तालुका प्रमुख मायकल मेश्राम, युवासेना शहर प्रमुख बाजीराव तरोने, आमगाव शहर प्रमुख अतूल चौहान, फुलीचंद चींधालोरे व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.

जनप्रतिनिधीनी केलें हात वर…

धानोली-बाम्हणी रस्त्या संबंधित अनेकदा शासन प्रशासनाला मागणी करूनही याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शेवटी नागरिकांच्या सहकार्याने या मागणीला घेऊन उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. या उपोषण स्थळाला स्थानिक जनप्रतीनिधि यांनी भेट दिली असुन फक्त उपोषनाला पाठिंबाच करीत राहिले. माञ रस्त्याच्या कार्याबद्दल आपले हात वर केले.

उपोषणाला गावकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद, गावात राहणार चुल्हा बंद…..

धानोली-बाम्हणी रस्त्यासाठी उपोषणनाचा आज पाचवा दिवस असुन उपोषणाला गावकऱ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. आज पासुन गावकऱ्यांनी उपोषनाला पाठिंबा देत चूल्हा बंद ठेवून उपोषण स्थळी आपली महत्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यामुळे आमरण उपोषण अधिकच तीव्र झाले आहे.