नरसिंहपल्ली येथे जनसंवाद कार्यक्रमानिमित्त उसळला जनसागर..

0
118
1

 

सिरोंचा: तालुक्यातील अतिदुर्गम अश्या नरसिंहपल्ली येथे शुक्रवारी (27 सप्टेंबर) रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत भव्य जनसंवाद कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम,अहेरीचे माजी पंचायत समिती सदस्य हर्षावर्धन बाबा आत्राम,अहेरीचे माजी सरपंच रामेश्वर बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटलक्ष्मी आरवेली, रेगुंठाचे सरपंच सतीश आत्राम,उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार,नगरसेवक सतीश भोगे, नगरसेवक सतीश राचर्लावार, फाजील पाशा,संजय पेदापल्ली, ओमप्रकाश ताटीकोंडावार,सलाम शेख,सल्लार सय्यद,शंकर बंदेला, रमेश मानेम,समय्या कुळमेथे,कैलास कोरेत,मांतय्या आत्राम,पराग पांढरे, उमानूरचे सरपंच श्रीनिवास गावडे, नरसिंहपल्लीचे सरपंच किष्टय्या पोरतेट,उपसरपंच लसमय्या नलगुंटा, राजेश शेट्टीवार,सुमनबाई मडावी, सुष्मिता पाटेम,विना अग्गुवार, मोयाबीनपेठाचे सरपंच बेबीताई कोडापे,उपसरपंच शंकर रत्नम, सत्यना कवटारपू, संतोष जाकेवार,अहेरीचे सुरेंद्र अलोने, स्वामी पोन्नावार,अंजु तोडसाम, बोगटागुडमचे पोलीस पाटील रंगय्या कोडापे,दर्षेवाडाचे पोलीस पाटील वेंकटस्वामी कावरे,पीरमिडाचे पोलीस पाटील लचन्ना चेनुरी,येलाचे पोलीस पाटील पेंटाजी जाकेवार,ग्रा.प.सदस्य चंद्रकांत कोडापे,भीमराव सडमेक बायका आलाम, श्रीनिवास जंगम, शंकर सल्लावार,व्येंकना चुकावार, नारायण कडार्ला,बकय्या तोडसाम, रामकिष्टु नीलम,कोंडया कटकू, गोविंदा पेदी, समय्या शेट्टीवार, राजण्णा अग्गुवार, रमेश तोटावार, पोचण्णा मारशेट्टी समय बेझानी, मुतय्या पाकला, सुरेश सुंकरी,वेंकटेश अग्गुवार,राजेश पट्टेम,निर्मला कुळमेथे, व्यंकटेश पडालवार,हैदर शेख,पापय्या कुमरी आदी उपस्थित होते.

 

या कार्यक्रमात मंत्री आत्राम यांनी महायुतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मंचावर उपस्थित अन्य मान्यवरांनी देखील मोलाचे मार्गदर्शन केले त्यात विरोधकांच्या भूलतापांना बळी न पडता मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

जनसंवाद कार्यक्रम आटोपताच मंत्री आत्राम यांनी परिसरातील नागरिकांशी चर्चा करत समस्या जाणून घेतली त्यानंतर निवेदन देखील त्यांनी स्वीकारले. एवढेच नव्हे तर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित प्रशासनातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देशही दिले.कार्यक्रमात परिसरातील विविध लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ देखील त्यांच्या हस्ते देण्यात आला.

दरम्यान नरसिंहपल्ली गावात आगमन होताच मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आला यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.