
वर्धा जिल्हा प्रतिनिधी: गजानन पोटदुखे
दिनांक: 02 ऑक्टोंबर 2024
देवळी शहरातील देवळी तालुका क्रीडा संकुलामध्ये महात्मा गांधी यांची 155 वी जयंती खेळाडू, विद्यार्थी, आणि विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरी करण्यात आली. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असून, त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे झाला. त्यांचे वडील करमचंद गांधी पोरबंदर राज्यात दिवाण होते, तर त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई होते. महात्मा गांधींना वाचनाची विशेष आवड होती, आणि वाचलेल्या गोष्टींनी त्यांच्या जीवनावर गहिरे परिणाम केले.
या प्रसंगी असंख्य विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी हजेरी लावली होती. तसेच नागरिक आणि विविध मान्यवर प्रशिक्षक यामध्ये सहभागी झाले होते. उपस्थितांमध्ये सुरेंद्र गांडोळे, अशोक वेळेकर, सुरज डाखरे, गोपाल सोनी, गजानन पोटदुखे, शेखर कलोडे, यश जबडे, विशाल शर्मा, वैद्य यांचा समावेश होता.


