विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स मशिनरीची खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते स्थापना

0
551
1

➡️ भिलेवाडा येथे उद्योग विस्ताराचे स्वप्न साकार

भंडारा : तालुक्यातील भिलेवाडा येथे आज विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या संयुक्त रेफ्रिजरेटर व एलईडी टीव्ही बनवणाऱ्या आधुनिक मशिनरीची स्थापना खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

प्रशिक्षीत आणि अप्रशिक्षीत बेरोजगारांसाठी नवी दिशा:भिलेवाडा येथे या उद्योगाच्या स्थापनेसाठी खा. प्रफुल पटेल यांनी विशेष प्रयत्न केले होते. या प्रयत्नांमुळेच आता जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक्स उद्योग उभा राहत आहे. विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांच्या माध्यमातून प्रशिक्षीत आणि अप्रशिक्षीत तरुणांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत, ज्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल.

या समारंभात खा. प्रफुल पटेल यांच्या समवेत अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होत्या. यामध्ये मा. नानाभाऊ पंचबुध्दे, मा. आमदार राजुभाऊ कारेमोरे, मा. धनंजय दलाल, मा. सुनिल फुंडे, विंडवेल इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि. आणि हुंडई इलेक्ट्रॉनिक्सचे मा. श्री. बलराम गर्ग, श्री. सुक्षम गर्ग, श्री. उमेश गोगीया, श्री. निरज अडवाणी, श्री. दर्शनजी, श्री. मिश्राजी, श्री. हितेंद्र कपाडीया, श्री. डागा, श्री. राठोड, जयंत वैरागडे, एड. विनयमोहन पशिने, श्री. पंकज सारडा, नरेंद्र झंझाड, हेमंत महाकाळकर, शरद (आरजु) मेश्राम, यशवंत सोनकुसरे, सरीताताई मदनकर, स्वप्नील नशिने, डॉ. रविंद्र वानखेडे, परवेज पटेल, डॉ. जगदीश निंबार्ते, रिकु शर्मा, अंबादास मंदुरकर, विजय खेडीकर, मनीष वासनिक, ज्योती टेंभुर्णे, दयानंद नखाते, नरेंद्र बुरडे, राहुल निर्वाण, लोकेश नगरे, अमन मेश्राम, नरेश धुर्वे, ज्योती खवास, निलीमा गाढवे, मंजुषा बुरडे, रजनिश बन्सोड, आशा डोरले, स्वाती मेश्राम, किर्ती गणविर, रत्नमाला चेटुले, संजय बोंदरे, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, गीता कागदे, कांचन वरठे, गणेश बाणेवार, अबरार भाई, अरुण अंबादे, बंटी बांगडकर, राजेंद्र आनंद, आशिष दलाल, गौरव गुप्ता, अज्ञान राघोर्ते, महेश जगनाडे, संजय लांजेवार, जनराज मस्के, अरुण माकडे, वामन शेंडे आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान खा. प्रफुल पटेल यांनी सांगितले की, जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी हा प्रकल्प मोठी संधी आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगार मिळेल आणि जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधता येईल.