बस व दुचाकीच्या धडकेत मुलगा ठार

0
368
1

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

शेगाव वरून जवळ असलेल्या भेंडाळा पाटीवर दुचाकी व एसटी महामंडळाच्या बस च्या झालेल्या धडकेत भेंडाळा रहिवाशी वय १५ वर्षे दुचाकी चालक सृजन राजू साळवे घटनास्थळी ठार झाला असून मागील चार तासापासून महामार्गावर तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.सदर घटना 20 ऑक्टोबर ला सकाळी 7 वाजताचे सुमारास घडली.सदोष रस्ता बांधकाम सदर अपघाताला कारणीभूत ठरल्याचा ठपका ग्रामस्थांनी रस्ता बांधकाम करणारी कंपनी के एस के कंपनीवर ठेवला. आणि मृतकाचे नातेवाईकांना जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत शव उचलणार नाही असा पवित्रा घेतला. अखेर काँग्रेस नेते तथा कृ ऊ बा वरोरा चे माजी सभापती, विद्यमान संचालक राजेश चिकटे यांनी कंपनीचे एमडी जयंत खडतकर यांना खडसावून सांगितले की, मृतकाचे कुटुंबियांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावी अन्यथा अनर्थ घडेल असा इशारा दिला. त्यानंतर एम डी ने 12 लाखाची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले.मदत मान्य झाल्यानंतर तणाव निवळला आणि मृतकाचे शव उचलून शवविच्छेदन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे आणण्यात आले.प्राप्त माहितीनुसार सृजन हा शेगाव येथील नेहरू विद्यालयाचा नवव्या वर्गाचा विद्यार्थी होता.रविवार सुट्टी असल्यामुळे बजाज कंपनीची सिटी १०० बाईकने क्र. एम. एच. ३४ बी. एस. ९४४६ गावाच्या रस्त्यावरून चिमूर -वरोरा महामार्गांवर लागूनच शेतामध्ये जाण्यासाठी मृतक आपली बाईक रस्त्यावर आणत असताना, मृतकाचे दुचाकीला चिमूर आगाराच्या बस क्र. एम. एच. ४० बी. एल. ३९८८ चिमूर चंद्रपूर सुपर बसणे धडक दिल्यामुळे जागेवरच ठार झाला. ही धडक एवढी भीषण होती की सृजन हा धडक बसताच बसच्या काचेवर जाऊन आदळला. बाईक बसच्या समोरील चाकात येऊन १०० मीटर घासत गेली. ही घटना गावकऱ्यांना व परिसरातील नागरिकांना माहिती होताच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले व जोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग बांधकाम करणारे कंपनी मृतकाच्या परिवाराला आर्थिक मोबदला देत नाही तसेच गावातून मुख्य महामार्गांवर येणारा रस्ता करून देण्याचे आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन राष्ट्रीय महामार्ग चार तास रोखून धरला होता.स्थानिक पोलीस स्टेशन शेगाव चे सहा. पोलीस निरीक्षक योगेंद्र यादव यांनी मध्यस्थी करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पण जमाव आपल्या मागणीवर कायम राहिले. शेवट दोन तासानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर राकेश जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. तरीसुद्धा तणाव कायम होता.तदनंतर काँग्रेस नेते, कृ. ऊ. बा वरोरा चे माजी सभापती राजेश चिकटे हे घटनास्थळी दाखल झाले रस्ता बांधकाम कंपनी चे प्रोजेक्ट अधिकारी विजयकुमार आणि पोलीस अधिकारी राकेश जाधव व राजेश चिकटे यांच्यात बोलणी झाली.आर्थिक मदतीची बोलणी फिसकट गेली. त्यानंतर राजेश चिकटे यांनी कंपनीचे एमडी जयंत खडतकर यांचेशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला आणि आर्थिक मदत देत नसेल तर ग्रामस्थांकडून उद्रेक होऊ शकतो असा अल्टीमेट देण्यात आला.अन्यथा आर्थिक मदत देऊन मोकळे व्हा. कंपनीचे एम डी ने 12 लाखाची आर्थिक मदत दिली. यामध्ये 10 लाखाचा चेक आणि 2 लाख नगदी अशी मदत मृतकाचे कुटुंबाला देण्यात आली.मागील चार तासापासून राष्ट्रीय महामार्ग हा ठ्ठप पडून दोन्ही बाजूला वाहणाच्या लाबंच लांब रांगा लागलेल्या होत्या.

चार तासानंतर जमाव निवळला पोलीस विभागाकडून दंगा नियंत्रण पथक पाचरण करण्यात आले होते.

ही घटना झाल्या नंतर घटना घडलेल्या एस. टी. बस चे चालक जवळील पोलिस स्टेशन शेगाव येथे स्वतःहून जमा झाले होते.