
आमगांव : महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गोंदिया यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा प्राधिकरण, आमगाव व वकील संघ, आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा सप्ताह व बालक हक्क दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आमगाव न्यायालयातून शहरात जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले.
ही रॅली दिवाणी न्यायाधीश ‘क’ स्तराचे न्यायाधीश एम. व्ही. जावळे यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक दिवाणी न्यायाधीश क स्तराचे न्यायाधीश एल. आर. जोशी, तसेच तालुका वकील संघ, आमगावचे अध्यक्ष ऍड. एस. डी. बागडे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली. रॅली न्यायालयापासून सुरू होऊन आंबेडकर चौक, गांधी चौक आणि शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडली.
रॅलीदरम्यान, विधी सेवा सप्ताह व बाल हक्क दिनानिमित्त नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पॉम्पलेट वाटप करण्यात आले तसेच शहरातील दुकानदारांच्या सहकार्याने स्टिकर लावून जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमात न्यायालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.दिवाणी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक: एस. बी. चौधरी, न्यायालयीन कर्मचारी लघुलेखक पी. बिसेन, भानू सोनी, वरिष्ठ लिपिक आशा ठाकरे, व्ही. बी. मोहनकर, कनिष्ठ लिपिक जे. एल. जांभुळकर, वाय. एल. बोपचे, सौ. डी. एस. कुथे, कु. आशा मेश्राम, अमोल चव्हाण, आर्य सहारे, कु. एन. आर. पाटील, एस. डी. पटले, जी. के. भुरे, के. पी. बारी, गौरव नन्हेट, विजय कठाणे, कु. दुर्गेश्वरी पटले वकील संघाचे सदस्य अध्यक्ष : एड. एस. डी. बागडे,सचिव: एड. के. जी. कठाणे,कोषाध्यक्ष: एड. मिथुन गुप्ता,सदस्य: एड. एच. आर. गुप्ता, एड. आर. डी. गुप्ता, एड. एम. के. बहेकार, एड. प्रियंका बागडे, एड. ए. जी. शेंडे, एड. सी. सी. राठी, एड. व्ही. डी. रहांगडाले, एड. के. एम. लिल्हारे, एड. बी. एस. पाथोडे, एड. यु. बी. नागपुरे, एड. ए. पी. बोरकर, एड. आर. एस. खोब्रागडे सह पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी,सौं. एस. डी. मदारकर,आर. डी. चौधरी,केशव फुंडे,कु. मीना लिल्हारे आदि कर्मचारी उपस्थित होते.
या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विधी सेवा सप्ताह व बालक हक्क दिनाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व अधिकारी, कर्मचारी, वकील संघ आणि पोलीस विभागाचे अभिनंदन करण्यात आले.
शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले आणि समाजहितासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.


