निर्भीड बाण्याचा कणखर कर्मयोध्दा, स्व.बाबुराव रामजी शरणागत, ◾ बाबुराव शरणांगत यांनी घडविला डोंगरला गावाचा इतिहास

0
152
1

भंडारा /सतिष पटले जिल्हा प्रतिनिधी

बाबुराव शरणांगत यांची डोंगरला ही जन्मभूमी आहे. यांचा जन्म .२२ फेब्रुवारी १९४५ तर मृत्यू १२ डिसेंबर २००५ आहे, तुमसर तालुका अंतर्गत असलेल्या डोंगरला गावात रामजी खडसुजी शरणागत व जयनाबाई रामजी शरणागत या शेतकरी दाम्पत्याच्या घरात २२ फेब्रुवारी १९४५ रोजी बाबुराव या बाळाचा जन्म झाला,

बाबुराव बालपणा पासुनच हुशार होता.१९५४ ला जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा डोंगरला येथे पहिल्या वर्गात शिक्षण सुरू झाले, बाबुराव पहिल्या वर्गापासुनच शिक्षणात हुशार होता, १९५४ ते १९५८ पर्यंतचे प्राथमिक शिक्षण चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा डोंगरला, येथे घेऊन माध्यमीक शिक्षणासाठी १९५८ साली तुमसर तालुक्यातील येरली गावात रस्ता नसतांनाही पायवाटेने जाऊन वर्ग ५ ते वर्ग ७ पर्यंतचे माध्यमिक शिक्षण येरली जिल्हा परिषद शाळेत १९६१ पर्यंत घेतले, व लगेच उच्च शिक्षणासाठी तुमसर येथील नेहरू हाॅयस्कुल मधे १९६१ ते १९६३ पर्यंत ८ वी व १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले.१९६३ साली मॅथोमॅटिक हायर मॅट्रिक उत्तीर्ण झाले. घरची परिस्थिती बिकट असल्याने आई वडील व भावंडा बरोबर वडिलोपार्जित शेती व उद्योग करुन आपली उपजीविका भागवू लागले. बाबुराव शरणागत यांची शेती नाल्यालगत असुन त्यांच्या शेतात जाणाऱ्या पांदन रस्यावर अतिक्रमण होते. अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी बाबुराव शरणांगत यांनी आंदोलन उभारले. पहिली चळवळ सुरू झाली.व १९६५ साली बाबुराव शरणांगत यांनी पांदण रस्त्यासाठी प्रकरण न्यायालयात दाखल केले. १९७० साली बाबुराव शरणांगत यांना न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणात अखेर न्याय मिळाला,

भंडारा लोकसभा क्षेत्राचे माजी खा. स्व.केशोराव पारधी यांचेशी बाबुराव शरणांगत यांचे जवळचे संबंध व विश्वास पात्र असल्यामुळे बाबुराव शरणांगत यांना केशवराव पारधी यांनी आपल्या नागपुर येथील पेट्रोल पंपांची जवाबदारी दिली, व ते पेट्रोल पंपावर मॅनेजर पद घेऊन नोकरी करू लागले, १९७९ ला नोकरी सोडून स्वगावी परतले व गावात समाज कार्य व शेती करु लागले, माजी खा. केशोराव पारधी यांनी पुन्हा बाबुराव शरणांगत यांच्याकडे राजकीय जवाबदारी दिली व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवुन उदर निर्वाहासाठी राशन दुकान दिले१९८६ ते १९८७ दरम्यान डोंगरला गावात शिक्षणमहर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांवर डोंगरला गावात जनजागृती करून गावात समाजकार्य घडविण्यासाठी ग्राम स्वच्छता अभियान व महिला मेळावे आयोजित केले महात्मा ज्योतिराव फुले.व डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मार्गदर्शन सभा, ग्रामगीता वाचन व अनेक समाजप्रबोधनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळचे माजी आमदार, स्व. सुभाषचंद्र नारायणराव कारेमोरे यांनी सुध्दा उपस्थित राहुन जनतेला ग्रामगीतेचे महत्त्व कायदे विषद केले होते, १९८८ ला बाबुराव शरणांगत यांनी डोंगरला गावात अंधश्रद्धा निर्मुलनाचे कार्यक्रम आयोजित करुन अंधश्रद्धे बाबदचा विचार गावकऱ्यांना पटवुन दिला होता,१९८८ ते १९९० च्या दरम्यान डोगरला गावात दारूबंदी व नशा मुक्तीच्या भव्य दिव्य आंदोलनांचे नेतृत्व करुन समाजात जनजागृती केली,

१९९१ ते १९९५ दरम्यान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका सचिव म्हणून काम पाहिले व जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा डोंगरला येथे १९९२ ते १९९७ पर्यंत ग्रामशिक्षण समितीचे उप सभापती पदी विराजमान होऊन गावात शैक्षणिक कार्यात मोठा योगदान दिला आहे, सन २००३ ते २००५ ह्या काळामध्ये ग्रामपंचायत डोंगरलाचे माजी सरपंच गणेश राऊत,माजी सरपंच प्रितीलाल पटले, पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती गोसुलाल बघेले, ग्रामपंचायत सदस्य मधुकर वासनिक,सदाशिव पटले,तुलाराम राऊत, यांचेसह गावातील सामाजीक कार्यकर्ते मोतीराम मोरे,कमलाबाई बनकर,श्यामाबाई पटले यांच्या सहकार्याने गावात दारूबंदी व नशामुक्तीचे अभियान राबविण्यात आले,डोंगरला गावातील जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळेत बाबुराव शरणांगत यांच्या पुढाकाराने शंभर ते दीडशे व्रुक्षांची लागवड करण्यात आली, व आजही त्या व्रुक्षांची देखभाल संगोपन ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ शिवनकर,शाळेचे विद्यार्थी,शिक्षक सातत्याने करीत आहेत, दारुबंदी व व्यसनमुक्तीची चळवळ आजही बाबुराव शरणांगत यांचे सहकारी प्रितीलाल पटले,गोसुलाल बघेले,मधुकर वासनीक,मोतीराम मोरे,तुलाराम राऊत व ईत्यादी ग्रामस्थ दारुबंदी व्यसनमुक्ती ची चळवळ डोंगरला गावात सातत्याने चालवत आहेत,बाबुराव शरणांगत यांनी म्रुत्यु पूर्वी जिल्हा परिषद पुर्व माध्यमिक शाळा डोंगरला येथे राबविलेलली व्रुक्षांची लागवड शाळेच्या आवारातील जिवंत व्रुक्ष आजही साक्ष देत आहेत, निर्भिड बाण्याचा व कणखर भूमिका घेणारा निर्भिड कार्यकर्ता बाबुराव शरणांगत यांनी केलेले कार्य व राजकारण डोंगरला गावातच नव्हे तर तुमसर तालुक्यात व परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे .