नगरपंचायत क्षेत्रात तात्काळ रोजगार हमी योजनेची कामे सुरू करा

0
98
1

उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांना निवेदन

सालेकसा / बाजीराव तरोने

राज्यभरात राज्य शासनाच्या धोरणानुसार तालुकास्तरीय ग्रामपंचायत चे रूपांतरण नगरपंचायत मध्ये करण्यात आले. त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा नगरपंचायतची स्थापना पण राज्य शासनाच्या अधिसूचना 12 फेब्रुवारी 2015 च्या प्रमाणे करण्यात आली. सालेकसा ग्रामपंचायत असताना त्यामध्ये जांभळी, बाकलसर्रा, हलबीटोला, मुरूमटोला, रामजीटोला कोवाचीटोला, गोंडीटोला आणि सालेकसा ह्या गावाच्या समावेश होता. 2011 जनगणनेनुसार ही लोकसंख्या 3690 च्या जवळपास आहे .
        शासन निर्णय क्रमांक एम.यु.एन. 2017/प्र. क्र.325/नवीन 18 प्रमाणे सालेकसा नगरपंचायत ची हद्दवाढ करून त्यामध्ये दिनांक 8 ऑगस्ट 2018 रोजी ‘आमगाव खुर्द’ ह्या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला. आमगाव खुर्द ह्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2011 च्या प्रमाणे 5197 एवढी आहे. ज्यामध्ये मग्रारोहयो च्या अंतर्गत आमगावखुर्द चे 900 जॉबकार्ड धारक मजूर आहेत. तसेच सालेकसा, जांभळी, हलबीटोला, मुरूमटोला, बाकलसर्रा, रामजीटोला, कोवाचीटोला , गोंडीटोला ह्या संपूर्ण क्षेत्राचे अंदाजे 800 च्या वर जॉब कार्डधारक मजूर आहेत, त्यांना मागील अकरा वर्षापासून तसेच आमगाव खुर्द च्या मजुरांना मागील आठ वर्षापासून त्यांच्या हाताला कोणतेही काम मिळाले नाही, त्यामुळे त्यांना नागपूर, रायपूर, हैदराबाद, पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहराकडे तसेच अन्य ठिकाणी रोजगारासाठी भटकंती करावी लागते. त्यांचे सर्रास म्हणणे आहे की नगरपंचायत ची स्थापना आमच्यासारख्या गरीब जनतेसाठी धोक्याची ठरली. रोजगार, शैक्षणिक योजनेचे लाभ, गाई, शेळी चे गोठे योजना, व ईतर शासकीय योजना पासून आम्हाला वंचित रहावे लागत आहे. अन्य विकास कामे होत असतील तर नगरपंचायत क्षेत्रातील मजुरासाठी शासनाची ठोस उपाययोजना का नाही? या ग्रामपंचायतचे स्वरूप बदलून नगरपंचायत झाली असेल पण त्याच्या आंतरिक स्वरूप’ ग्रामीण’ च आहे. लोकांना 11 वर्षा पासून रोजगार पासून वंचित ठेवणे योग्य नाही.
    ह्या विषयावर गंभीरतेपूर्वक लक्ष देऊन तात्काळ रोजगार हमी योजनेचे कार्य सुरू करावे अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य ब्रजभूषण बैस व बाजीराव तरोने यांच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार व नगरपंचायत प्रशासक नरसया कोंडागुर्ले यांच्यामार्फत उपमुख्यमंत्री तथा मंत्री नगरविकास विभाग एकनाथ शिंदे यांना करण्यात आले.

नगरपंचायत क्षेत्रातील नागरिकांना बेरोजगारीचा फटका : सालेकसा ग्रामपंचायत ही नगरपंचायत मध्ये रूपांतर झाली तेव्हापासून येथील नागरिकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले या नगरपंचायतीला अंदाजे सतरा से च्या वर जॉब कार्डधारक मजूर आहेत. या मजुरांना अकरा वर्षापासून रोजगारापासून वंचित राहावे लागले आहे त्यामुळे यांना बेरोजगारीचा फटका ही या क्षेत्रात बसत आहे. नगरपंचायतचा कर जोमात आणि येथील बेरोजगार कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

नगरपंचायत झाली नागरिकांसाठी डोकेदुखी : नगरपंचायत ची स्थापना येथिल नागरीक गरीब जनतेसाठी धोक्याची ठरली. रोजगार, शैक्षणिक ,योजनेचे लाभ, गाई, शेळी चे गोठे योजना, व ईतर शासकीय योजना पासूनयांना वंचित रहावे लागत आहे.ग्रामपंचायतचे स्वरूप बदलून नगरपंचायत झाली असेल पण त्याच्या आंतरिक स्वरूप’ ग्रामीण’ च आहे. नगरपंचायत पेक्षा आपली ग्रामपंचायत बरी असेही उद्गार ग्रामीण नागरीकांच्या तोंडातून निघत आहेत