
अहेरी/प्रतिनिधी
“प्रत्येक शेतकऱ्यांकडून दोन किलो अधिकचे धान खरेदी प्रति पोत्यामागे केली जाते.अहेरी तालुक्यातील 40 ते 50 धान खरेदी केंद्रावर असाच लुटमार शेतकऱ्यांची होत आहे.याची चौकशी झाली पाहिजे व अनेक वर्षापासून असाच लुटमार शेतकऱ्यांची- आदिवासी विकास महामंडळ मार्फत धान खरेदी केंद्राचे संचालक मंडळ करीत आहेत.*उदाहरणार्थ एक शेतकऱ्यांनी 300 पोते धान विकल्यास तीनशे पोत्यामागे दोन किलो प्रमाणे सहाशे किलो- सहा क्विंटल धान जास्तीच्या शेतकरी खरेदी केंद्राला देतो* व सहा क्विंटलचे प्रति क्विंटल २५००चे प्रमाणे २५००×६=१५००० …..१५ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये न जाता ते परस्पर खरेदी केंद्राच्या खात्यामध्ये जातात.दहा हजार शेतकरी दरवर्षी धान विकत असतात या सर्व शेतकऱ्यांना मोठा फटका या कारणाने बसत आहे.अशाप्रकारे अहेरी उपविभागातील शेतकऱ्यांची नेहमीच लुट खरेदी केंद्राचे संचालक मंडळ करीत आहेत.” असा आरोप सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी लावला आहे. त्यामुळे अहेरी उपविभागातील धान खरेदी केंद्राची चौकशी करणे गरजेचे आहे अशी भूमिका सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांनी घेतली आहे.


